Tuesday, 7 February 2017

१ - जल व्यवस्थापन

सुमारे  पंचवीस  वर्षापुर्वी जलव्यवस्थापन / जलनियोजन / जलसाक्षरता हे शब्द सुद्धा आपल्याकडे म्हणजे जनसामान्याकडे ,प्रचारात नव्हते . त्यावेळी ह्या शब्धांचा फारतर शब्दशः अर्थाची आपण कल्पना करू शकलो असतो .परंतु २१ शतकाची सुरुवातच पाणी समस्येपासून झाली आहे. पाण्यावरून जागतिक किंवा महायुद्धे होतील असे भाकीत अनेक पंडितांनी वर्तवली आहेत .आता त्यातील सत्य, तथ्य, अगत्य कळू लागले आहे. वाढलेल्या लोकसंखेमुळे अन्नाची मागणी, पेयजल, शेतीजल, औद्योगीक जल ह्या समस्या वाढल्या आहेत. आता तर मोठे जलाशय प्रकल्पांची मागणी होत आहे. त्यातूनच मोठ्या कालव्यांतील भूपृष्ठीय जलवाहतूक, मत्स्योत्पादन ,जलविद्युत निर्मिती, नौका विहार, पर्यटन विकास, सामाजिक वनीकरण व वन्य पशुसंवर्धन, आर्द्रता नियमन, जागतिक पर्यावरण इ. विषय हळू हळू पुढे येऊ लागले आहेत. अशा सर्व पार्श्वभूमीचा विचार केल्यास ह्या सर्व समस्या किंवा मागण्या पाणी आधारितच आहेत .

अवकाशीय / खगोलशास्त्रीय संशोधनात नेहमी ऐकायला मिळते की, अमुक एका ग्रहावर पाण्याचे अस्तित्व असल्याच्या खुणा दिसून आल्या. त्यामुळे तेथे जीवाच्या अस्तित्वाची शक्यता असावी .....वगैरे. याचा अर्थ पाणी हेच जीवन आहे. पाण्या वाचून जीवाचे अस्तित्वच संभवत नाही. अशा ह्या पाण्याचे नियोजन करण्याची वेळ आली आहे.
     खरे तर पृथ्वीवर मुबलक पाणी आहे. परंतु पिण्याजोगे किंवा वापराण्याजोगे पाणी फक्त ३ % च आहे. त्यातील २.१% पाणी उत्तर व दक्षिण ध्रुवीय प्रदेश व उंच पर्वतराजी इत्यादी धरून बर्फ स्वरुपात आहे व फक्त ०.९ % पाणी  पिण्याकरिता व वापरण्याकरिता आपल्या हाताशी आहे आणि म्हणूनच ह्या ०.९  पाण्याकरिता महायुद्धे होऊ शकतील .कारण लोकसंखेच्या प्रमाणात हे पाणी त्या त्या भागात विखुरलेले नाही.  पर्जन्यमानही भौगोलिक परिस्थिती प्रमाणे वेगवेगळे आहे. मोठ्या नद्यांची खोरी सर्वत्र नाहीत. याचाच अर्थ पाणी सर्वत्र सारखे प्रमाणात विखुरलेले नाही. अश्या ह्या नैसर्गिक परंतु असमान पाणी वाटपामुळे युद्धे होऊ शकतील .त्यापेक्षा पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केल्यास शांतता व समृद्धी वाढू शकते .पाण्याचे  नियोजन दोन प्रकारे होऊ शकते. १) प्रत्येक्ष गरजेनुसार, लोकसंखे नुसार वाटप. 2) योग्य प्रकारे ”काटकसरीने, बचतीने वापर ”. विजेची बचत म्हणजे विजेची निर्मिती “असे एक घोष वाक्य आहे त्या धर्तीवरच “काटकसरीने पाणी वापर म्हणजे ज्यादा पाण्याचा पुरवठा .”असे म्हणता येयील .
काटकसरीने पाणी वापरसुद्धा दोन प्रकारे होऊ शकतो. १) पाणी वाया न जाऊ देता प्रमाण बद्धतेने वापरणे. 2) कमी पाण्याची पिके ,कमी पाण्याचे उद्योग धंदे इ. निवडणे. पिण्याच्या  पाण्यातील सांड पाण्या पासून शेतीला पाणी पुरवठा किंवा गटारीच्या पाण्याचा खत व पाणी म्हणून शेतीत उपयोग करणे. ही सुद्धा पाणी बचतच आहे. औद्योगिक वापरातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचे पुनर प्रक्रियेने शेती योग्य पाणी बनविणे. हे ही शक्य होणार आहे. त्या करिता जागतिक पातळीवर व प्रत्येक नागरिकाने आप आपल्या पातळी वर हा प्रयत्न कर्तव्य म्हणून केला पाहिजे .मानवता धर्माचा तो एक अत्यावशक भाग असल्याचे जनप्रबोधन झाले पाहिजे.
अश्या ह्या जल नियोजनाचा हा अभ्यास क्रम आता आपण क्रमा क्रमाने पाहू.

                       ... x ...

2 - पाण्याची नैसर्गिक शुद्धता

पृथ्वीवर साधारणपणे पाण्याची उपलब्धता पाऊसामुळेच होते. पाऊसाचे पाणी उताराच्या दिशेने /नदीमधून जलाशयाकडे / समुद्राकडे वाहत जाते. पाऊसाचेच व नद्यांचे पाणी जमिनीत सुद्धा मुरते. ह्या जमिनीत मुरलेल्या पाण्यालाच भूजल / भूगर्भजल इ. म्हणतात. काही ठिकाणी भूपृष्ठाच्या विशिष्ठ रचनेमुळे नैसर्गिक तलाव, सरोवरे, डोह इ. तयार होतात. ही सर्व जल उपलब्धतेची निसर्ग निर्मित साधने आहेत. मानव निर्मित जल साठे म्हणजे मानवी प्रयत्नांनी पाणी अडविणे, भूगर्भातून पाणी वर काढून वापरणे, कृत्रिम पाऊस पाडणे,आर्द्रतेचे घनिभवन करून पाणी मिळविणे, अशुद्ध अथवा समुद्री जला पासून शुद्ध पाणी मिळविणे इ. अर्थात ह्या सर्वांमध्ये पाणी हे निसर्ग निर्मितच असते. परंतु ते मानवी प्रयत्नांनी गरजेनुसार व सोयीनुसार मिळविले जाते.
शुद्ध पाणी म्हणजे फक्त हायड्रोजनचे दोन परमाणु व प्राण वायूचा एक असे संयुग होय. त्यात इतर क्षार किंवा कोणतेही विद्राव्य अगर घन पदार्थ मिसळले जाने म्हणजे पाण्याची अशुद्धता. काही अशुद्धतांमुळे रासायनिक प्रक्रिया सुद्धा घडून येते. काही अशुद्धता काही प्रमाणात आरोग्याला सहाय्यक सुद्धा ठरतात. उदा. बाजारात उपलब्ध पाण्याच्या बाटलीतील पाणी/ मिनरल वाटर हे शास्त्रीय दृष्ट्या शुद्ध नसते परंतु आरोग्याला मात्र योग्य ठरते. पाण्याचे नैसर्गिक रित्या सुद्धा शुद्धीकरण किंवा स्वच्छता होत असते. उदा. समुद्राच्या अशुद्ध पाण्याचे सूर्याच्या उष्णतेने बाष्पीभवन होते. ते अत्यंत शुद्ध असते. शुद्ध पाणी बाष्प रूपाने आकाशाकडे निघून जाते म्हणजेच समुद्र जळातील क्षार, अशुद्धता समुद्रातच शिल्लक राहते. युगायुगाच्या ह्या प्रक्रियेमुळे समुद्रीजल खारट व अशुद्ध झाले आहे. क्षार व अशुद्धतेचा लोंढा सतत समुद्रात येत असतो. त्यामुळेसुद्धा समुद्रीजल आजच्या रुपात अस्तित्वात आहे.
बाष्पीभवन मानवनिर्मित जलाशयातुनही होत असतेच पण समुद्रजलाच्या तुलनेत हे न गण्य असते. असो, असे हे बाष्प अर्थात बाष्परुपातील शुद्ध जल भूपृष्ठाच्या किंवा जलपृष्ठाच्या लगतच्या हवेच्या थरांच्या तुलनेत हलके असल्याने ते वर वर जाते. तेथील थंड वातावरणाने ते घनीभूत होत जाते. म्हणजेच त्याचे ढगात रुपांतर होते. कधी कधी अति गारव्याने त्याचे बर्फात (स्नो) रुपांतर होते. आता हे ढग/ बर्फ/ गारा रूपातील पाणी अति शुद्धच असते. कारण हवा अति उंचावर विरळ व कमी प्रदूषित असते. नैसर्गिक प्रक्रियेने हे ढगांच्या रूपातील पाणी पावसाच्या रूपाने भूपृष्ठावर येते. (पाऊस कशामुळे पडतो याचा विचार आपण येथे करीत नाही.). हे पाणी भूपृष्टावर पडण्या आधी पर्यंत काही प्रमाणात धुलीकनांच्या सम्पर्कात येऊनही जवळ जवळ शुद्धच असते. परंतु जमिनीवर पडल्यावर ते माती, धूळ, इतर क्षार, पालापाचोळा, कचरा यांचे संपर्कात येते आणि मोठ्या प्रमाणात अशुद्ध बनते. पावसाचे पाणी जमिनीवरून उताराच्या दिशेने वाहत जाते. त्यालाच पाण्याचा अपघाव (रनओफ) असे म्हणतात. हे पर्ज्यन्य जल नाले, ओहोळ व पुढे नद्यांचे स्वरुपात वाहत जाऊन जलाशयात रुपांतरीत होते किंवा समुद्राला जाऊन मिळते. जमिनीवरून पर्जन्य जल वाहत असतानाच ते काही प्रमाणत जमिनीत मुरते. त्या मुरलेल्या जलालाच भूजल किंवा भूगर्भ जल म्हणतात. हेच जल पुढे नदी, झरे, विहिरी इ. ठिकाणी प्रकट होते. आपला मुद्दा पाण्याच्या शुद्धतेशी संबंधित आहे. पावसाचे पाणी जमिनीवर पडण्या पूर्वी बहुंशी शुद्ध असते. हे नैसर्गिक शुद्धीकरणच असते. अजून नैसर्गिक जल शुद्धीकरणाचे काही प्रकार पाहू.
पर्जन्यजल जमिनीवरून अनेक प्रकारे नदीत पोहोचल्यावर ते नदी रूपाने वाहतांना माती, क्षार, मोठ्या प्रमाणावर गाळाच्या रुपात नदी तळाला किंवा किनाऱ्याला अपोआप सुटतात/ साचतात  व पाणी पुढे पुढे वाहत जाते. म्हणजे शुद्धतेचे प्रमाण वाढते. तसेच पाणी भूगर्भातून वाहतांना सुद्धा भूगर्भ रचनेमुळे आतल्या आत उतार शोधून वाहत राहते. त्यामुळेच विहिरींना पाणी येते. पाणी भूगर्भातून वाहतांना म्हणजे मातीच्या वगवेगळ्या थरातून जातांना गाळले जाऊन अपोआप स्वचछ होते. तसेच सूर्य प्रकाश पाण्यावर पडूनही व हवेतील प्राणवायू पाण्यात काही प्रमानात मिसळला जातो, त्यामुळेहि पाण्याची शुद्धता वाढते. जलचरांकडूनहि पाण्यातील काही अशुद्ध कण किंवा सूक्ष्म वनस्पती अन्न म्हणून वापरले जाते त्यामुळे सुद्धा पाणी शुद्ध होत रहाते. हे सर्व जलशुद्धीकरनाचे नैसर्गिक प्रकार आहेत. आता आपण मानवी प्रयत्नांनी जलशुद्धीकर्नाचे प्रकार पाहू.         

          --------------------------xxx---------------------------

३-जलशुद्धीकरण—मानव निर्मित

प्रत्येक जीवाचा कल हा संकटावर / अडचणीवर मात करून नवा पर्याय / मार्ग शोधण्याकडे असतो. त्यातूनच उत्क्रांती साधत असते. त्याच प्रमाणे पाण्याच्या उपलब्ध प्रकारानुसार त्यातून ज्यास्तीत जास्त चांगल्या प्रकारे पाणी कसे मिळविता येईल व हे चांगले / पेय जल कसे सुरक्षितपणे साठविता येईल ? संरक्षितपणे व काटकसरीने कसे वापरता येईल ? असा विचार अनादी काळापासून आपापल्या परीने प्राप्त परिस्थितीनुसार प्रत्येक जीव करीत आला. पूर्वी पाणी अडविणे ही  कल्पना अस्तित्वात नव्हती. त्यामुळे जीवाने आपली वस्तीच पाण्याच्या स्त्रोतांजवळ केली. पाण्याच्या जवळपास आश्रय घेतला. तूर्त आपण ह्या इतिहासात न डोकावता वर्तमानातीलच परिस्थितीचा विचार करू व सर्व जीवांच्या प्रयत्ना ऐवजी फक्त मानवी प्रयत्नांचाच विचार करू.
सरोवरातील किंवा वहात्या नदीतील पाण्याचा उपयोग मानव प्रथम पेय जल म्हणून करू लागला. पुढे जमिनीतून येणाऱ्या झऱ्याचे पाणी स्वचछ  पेय जल म्हणून वापरू लागला. त्यातून विहिरीची कल्पना जन्माला आली. उन्हाळ्यात किंवा दुष्काळात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असेल तेंव्हा मोठ्या जल स्त्रोतांच्या आसऱ्याने तो राहू लागला. तो आपले पिण्याचे पाणी जनावरांकडून दुषित होऊ नये म्हणून काळजी घेऊ लागला. पुढे पाणी गाळून वापरणे, उकळून घेणे, निर्जंतुक करणे, ऊर्ध्व पातन करणे. अशा क्रिया तो शिकला. त्यातूनच पाण्याचे शुद्धीकरणाचे प्रकार निर्माण झाले.
आता पाण्याच्या स्वच्छतेनुसार पाण्याचे प्रकार किंवा पाण्याच्या गरजेनुसार पाण्याची स्वच्छता पाहू.
१)मानवी वापराकरिता पेयजल २) मानवी घरगुती वापराचे जल
३) पशून्करिता पेय जल  ४) शेती करिता जल  ५) औद्योगिक वापराकरिता जल  ६) औषधी निर्मिती करिता जल ७)मत्स्योद्पादन, जलविद्यूत, जलवाहतूक, पर्यटन, नौकाविहार इ. अशा अनेक कारणांनी मानवाला कमीजास्ती शुद्धतेचे पाणी आवश्यक असते व तो गरजे नुसार आणि प्राप्त परिस्थितीनुसार ते मिळविण्याचा प्रयत्न करतो.
१) मानवी पेय जल – १००% शुद्ध असलेच पाहिजे असे नाही. त्यात काही प्रमाणात नैसर्गिकपणे परंतु मानविजीवनास उपयुक्त असे क्षार विद्राव्य स्वरुपात असल्यास चालते.
२)मानवी घरगुती वापरासाठी – अन्न शिजविणे, अनेक प्रकारच्या साफ सफाई, सांडपाणी व मल वित्सर्जन इ. कामांसाठी लागणारे पाणी सर्वसाधारणपणे स्वच्छ  असले तरी चालते.
३) पशु करिता पेय जल – सर्वसाधारणपणे स्वच्छ असावे.
४) शेती उपयोगी पाणी – वरील १,२,३, प्रकार पेक्षा ज्यास्त अशुद्ध असले तरी चालू शकते. खत मिश्रीत, गाळ किंवा शेतीपयोगी क्षार मिश्रित पाणी चालते.
५) औद्योगिक वापराकरिता पाणी – गरजेनुसार स्वच्च असावे.
६) औषधी निर्मिती करिता – अति शुद्धच असले पाहिजे.
७) मत्स्योत्पाद्नाकरिता पाणी – पाण्याचे साधारणपणे दोन प्रकार समजले जातात. अ) खारे पाणी व ब) गोड पाणी. मत्स्योत्पादना करिता दोन्ही प्रकारांचे पाणी चालते. परंतु समुद्री जलातील व नद्यातील मत्स्योत्पादन हे नैसर्गिक मानले जाते. परंतु लहान मोठे मानव निर्मित तलाव किंवा जलाशयातील मत्स्योत्पादन हे मानवी प्रयत्नात मोडते. त्या करिता साधारण स्वच्छ पाणी चालते.
     मत्स्योत्पादन, जल विद्युत, जल वाहतूक ( कालवे, मोठ्या नद्या, मोठी धरणे-जलाशय ),
पर्यटन व नौका विहार इ. करिता पाणी साधारण स्वच्छ चालते. अशुद्ध, अस्वच्छ, घान, प्रथम वापरा नंतरचे पाणी हे प्रदूषित समजले जाते व त्यातील अशुद्धतेला कारणीभूत असलेले घटक काढून टाकून ते परत वापरता येते. अशा प्रक्रियेला फेर प्रक्रिया म्हणतात. पाण्यावर फेरप्रक्रिया करतांना ते प्रक्रिया करावयाचे पाणी किती दुशीत आहे? फेर प्रक्रीये नंतर ते कशाकरिता वापरावयाचे आहे? यावर फेर प्रक्रिया कोणती व कशी करायला पाहिजे ते अवलंबून असते.
     फेर प्रक्रिया ही व्यवहारी, स्वस्त, टिकाऊ, कमीत कमी मानवी बळ खर्च होणारी असावी.
पेय जल ज्यास्तीत ज्यास्त शुद्ध असावे म्हणून अनेक प्रकारच्या प्रक्रिया करीत  शुद्ध करतात.
उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारच्या गाळण्या वापरून, तुरटी सारखे पदार्थ वापरून पाण्यातील तरंगणारे कण तळाला बसवून, हवा व सूर्य प्रकाशात पाणी कारंज्या सारखे उडवून, औषधींनी निर्जंतुकीकरण करून, साठा संरक्षित करून, सुरक्षित पाणी पुरवठ्याने किंवा बाटलीबंद पाणी पुरवठा करणे.
     जलाशयातील पाणी­ थेट इतर घरगुती उपयोगाकरिता, पशुन्करिता, सांडपाणी, शेती, औद्योगिक कामासाठी इ.साठी वापरता येते. औद्योगिक वापरातील पाणी किंवा इतर वापरून परत आलेले पाणी फेर प्रक्रियेने शेती उपयोगी बनवितात.

     पाण्याचे किती प्रमाणात शुद्धीकरण करावे? कश्या प्रकारे करावे ? जलाशयातील पाणी किती स्वच्छ असावे? त्याची शुद्धता कशी राखावी? हा विषय पूर्णपणे वेगळा आहे. म्हणून तूर्त आपण येथेच थांबू. आपण येथे मानवी प्रयत्नांनी पाणी शुद्ध होते व वापरले जाते. एव्हडेच पाहत आहोत.                                                                                                        ------x------

४-मानवी आरोग्य आणि पाणी

शरीरात किती टक्क्ये पाणी असते ? ७०% टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास नक्की किती ? हा आरोग्य व शरीर शास्त्राचा विषय आहे. येथे आपण त्या शास्रातील “ पाणी हाच जीवान्मद्ध्ये प्रमुख घटक असतो ” हा सर्व मान्य नियम गृहीत धरून पुढे जाऊ. अवकाशातील ग्रहांचा व त्यावरील जीवांचा शोध मानव घेत आहे. त्यात प्रथम त्या ग्रहावर पाणी आहे का ? असल्यास तेथे जीवाचे अस्तित्व कसे शक्य आहे, याचा शोध घेतला जातो. याचाच अर्थ असा की, पाण्याशिवाय जीवाचे अस्तित्वच शक्य नाही.  असे हे पाणी म्हणजेच जीवन. अति सूक्ष्म जीवापासून ते हत्तीसारख्या महाकाय जीवापर्यंत सर्वांना पाण्याची मुलभूत गरज असते. वनस्पती सुद्धा जिवंत असल्याने त्यांनाही पाण्याची गरज असतेच. याचा अर्थ समृध्द जीवन, निरोगी शरीर यांचा सम्बंद्ध जीवन्दाई पाण्याशी असतो. हवा, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा ह्या मुलभूत गरजा आहेत. पैकी हवा निसर्गाने सर्वत्र उपलब्द्ध करून दिली आहे. त्याकरिता जीवाला विशेष परिश्रम करावे लागत नाहीत. पाणी हे ठराविक स्रोतांमधून मिळते. अन्न शोधून / कष्ट पूर्वक मिळवावे लागते. निवारा शोधावा किंवा तयार करावा लागतो. वस्त्र हे शरीर संरक्षणाचा एक भाग आहे, त्यामुळे ते पण प्रयत्नांनीच मिळते. अशा गरजान्मद्धे प्रमुख गरज पाण्याचीच असते व ते ज्यास्तित ज्यास्त शुद्ध व स्वच्छ असावे लागते. त्या शिवाय आरोग्य सांभाळणे शक्य नाही. पाण्याच्या अशुद्धपणा पासून पचनाचे विकार होतात. अपचनामुळे इतरही रोग होतात. रक्त दोष सुद्धा निर्माण होतात, व त्यातूनही काही आजार निर्माण होतात.
पाणी उकळून गार करून पिण्यापासून तर बाटलीबंद पाण्यापर्यंत माणसाने प्रगती केली. तरी वेगवेगळे आजार नव्याने वेगवेगळ्या कारणांमुळे येत आहेत. काही जुनेच आजार नव्याने थोड्याफार फरकाने येत आहेत. साधारणपणे खाणे, पिणे, राहणीमान, प्रदूषण, अन्न प्रकार, शेतीतील खाते, इ. मुळे आजार वाढतात. आपण कितीही पौष्टिक, सकस, आहार घेतला तरी स्वच्छ पाण्याअभावी पचन संस्थेचे विकार व त्यातून पुढे उत्सर्जन संस्थेचे विकार होतात. त्यामुळेच रक्त दुषित होऊ शकते. शहरी भागात साधारणपणे स्वच्छ पाणी असते परंन्तु ग्रामीण भागात स्वच्छ पाणीच काय पण अस्वच्छ पाणी सुद्धा उपलब्ध होत नाही. ३ ते ४ कि. मी. वरून मिळेल तसे विहीर, झरा, इ. चे पाणी आणावे लागते. पशु पक्षी सुद्धा हेच पाणी वापरतात. कायम दारिद्र्य, अज्ञान, कुपोषण, अंध श्रद्धा यांच्या आवरणात जखडून पडलेल्या भारताच्या ग्रामीण परंतु बहुसंख्य जनतेचा आपण विचार करीत आहोत. मिळेल ते पाणी पिऊन बालपणापासून म्हातारपनापर्यंत सर्वच नागरिक जीवन कंठीत आहेत. त्याकरिता सर्वत्र उपलब्ध होऊ शकणारे स्वच्छ पाणी, वाटर फिल्टर सारखी परंतु स्वस्त उपकरणे सरकारने सर्वत्र उपलब्ध करून दिली पाहिजेत. हे सरकार व आपल्या सारख्या सुशिक्षित आणि सुरक्षित जीवन जगणाऱ्या नागरिकांचेही कर्तव्य आहे. सामाजिक बांधिलकीहि आहे. पाणी शुद्ध करण्याच्या परिणामकारक व स्वस्त पद्धती शोधणे हे आपलेच काम आहे. शेतीकरिता रासायनिक किंवा सदोष पाणी, तसेच रासायनिक खते या ऐवजी निर्दोष पाणी व सेंद्रिय खते वापरली पाहिजे.“ स्वच्छ पाणी म्हणजेच निरोगी जीवन ”. निरोगी जनता म्हणजेच निरोगी व सदृढ राष्ट्र. हे सूत्र जपून प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवला पाहिजे. हे प्रत्येक देशवासीयाचे परम कर्तव्यच आहे. दुर्गम भागातील उपलब्ध पाण्याच्या सर्व प्रकारांचे नमुने शास्त्रीय पद्धतीने गोळा करून त्या त्या जिल्ह्याच्या प्रयोग शाळेत त्याची तपासनी करून त्या त्या भागात योग्य ती उपाय योजना केली पाहिजे. शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे. अति दुर्गम भागापासून तालुक्याच्या गावाला जोडणारे रस्ते तयार झाल्यास त्या भागाला तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकेल. रस्त्यामुळे शिक्षणाचा प्रसार व इतर सुविधा निर्माण होऊ शकतील. त्यामुळेच परिस्थितीत फरक पडू शकेल.

------xxx-----  

५ - राष्ट्रीय पाणी नियोजन

बहूतेक सर्वच देशांमद्धे अनेक नद्या दुसऱ्या देशातून त्या देशात येतात तर काही नद्या त्या देशातून बाहेरच्या देशात जातात. अशा वेळी त्या नद्यांच्या पाणी वाटपाचा त्या त्या राष्ट्रांमध्ये काही वाद असल्यास आंतर राष्ट्रीय पाणी लवाद किंवा आंतर राष्ट्रीय जल नियोजन मंडळ वगैरेच्या सहाय्याने आंतर राष्ट्रीय नियमांच्या आधारे सोडविले जातात. आपल्या देशात तिबेट म्हणजेच चीन मधून ब्राह्म्ह्पुत्रा व अजून काहि दक्षिण वाहीनी नद्या येतात. तर आपल्याकडून सिंधू नदी व तिच्या उपनद्या पाकिस्थानात जातात. आपल्याकडूनच गंगा, ब्रम्हपुत्रा नद्या बांगला देशात जातात. त्या सर्व नद्यांचे काहीना काही तरी वाद चालूच असतात. बांगला देशाशी आपला फराक्का धरणावरून वाद आहे. पाकिस्थानाशी सिंधू / सतलज जल वाटपावरून वाद आहे. ब्रम्हपुत्रा इ. नद्यावरून आपला वाद आहे. नेपाळशी पण आपला काही पाणी - वाद आहे. असो, म्हणजे काय ? की, असे वाद मिटविण्या करिताच आंतर राष्ट्रीय यंत्रणा कार्यरत असते. हे वाद अनेक वर्षें चालू शकतात. त्यात राजकारण सुद्धा असू शकतात.
     असेच वाद आपल्या देशांतर्गत सुद्धा आहेत. विशेषतः दक्षिण भारतात ज्यास्त आहेत. उदा. कृष्णा खोरे पाणी तंटा. महाराष्ट्र, आन्ध्र, तामिळनाडू व काहीसा कर्नाटक या राज्ज्यात मोठा वाद आहे. त्या करिता कायदे सुद्धा आहेत व लवाद सुद्धा आहेत. अनेक वेळा त्याला राजकीय रंग देण्यात येतो. त्यामुळे ते अस्मिता इ. च्या नावाने चिघळतात. कोणत्याही मोठ्या नदीच्या खोऱ्याचा वाटर अकौंट म्हणजे सरासरी त्या नदीतून वर्षाकाठी उपलब्ध होणारे एकून पर्ज्यन्य जल व त्या जलाचा विभागवार वाटणीचा हिशोब. उदा. सरासरी पर्ज्यन्य गुनिला पाऊस पडणारे खोरा-क्षेत्र बरोबर अपेक्षित उपलब्ध पाणी. या नंतर त्या नदीची किती लांबी कोणत्या राज्यातून जाते तेव्हड्या लांबीच्या खोरा-क्षेत्राच्या सरासरी उपलब्ध पाण्या इतके पाणी त्या राज्ज्याला मिळावे. असा संकेत असतो. परंतु अपवाद म्हणून एखाद्या खोऱ्यात कायम किंवा प्रासंगिक दुष्काळ असल्यास कायम किंवा प्रासंगिक स्वरुपाची ज्यादा पाण्याची तरतूद एकूण पाण्यातून करून दिली जाते. उदा. नाशिक जिल्हयात अनेक धरणे असूनही पूर्वीच्या दुष्काळी नगर जिल्ह्याला ज्यादा पाणी दिले जाते. तसेच आपल्या राज्ज्यातील धरणांमुळे शेजारील राज्ज्याचे काही जमीन-क्षेत्र बुडत असल्यास त्या राज्ज्यालाही नुकसान भरपाई म्हणून काही पाणी दिले जाते.
     आपण हे समजून घेतले पाहिजे की, पाणी हा प्रत्येकाचा ज्वलंत प्रश्न आहे आणि तो न्याय पुर्वक व मानवता पुर्वकच सुटला पाहिजे. उदा. उत्तरेकडील नद्यांना १२ महिने पाणी असते ते दक्षिणेकडे वळवून दक्षिणेतील पाणी समस्या सोडविणे व पर्यायाने उत्तरेतील पूर नियंत्रण करणे हा एक चांगला प्रकल्प आहे. तो पैश्यानअभावी व राजकीय इच्छे अभावी रेंगाळत आहे. भविष्यात हा “ नदीजोड ” प्रकल्प साकार झाल्यास त्या पासून दक्षिण भागास होणाऱ्या फायद्या पोटी उत्तरेकढील राज्यांना काहीतरी मोबदला स्वरूप सुविधा द्यावी लागेल. जल-विद्युत किंवा जल-वाहतूक उपलब्ध झाल्यास त्यातून हिस्सा देण्याची पद्धत आहे. एकंदरीत पाण्याचे जेव्हडे काटेकोर नियोजन होईल तेव्हडी समृद्धी येईल हे खरे. जीवनमान सुधारेल. त्यातून देशाची प्रगती होईल. मत्स्योत्पादन वाढेल आणि त्या प्रमाणात शाकाहारी अन्नाची बचत होईल. सर्वत्र पाणी उपलब्ध झाल्यास हिरवळ, बागायत-शेती, वनीकरण, वाढेल व हवामान थंड राहील, त्यामुळे अजून पर्जन्यमान वाढेल. असे एकमेकांवर आधारित सुधारणा होत राहतील. औद्योगिक प्रगतीला हातबार लागेल व ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून शिक्षणात सुधारणा होऊन देशाची आर्थिक, बौद्धिक प्रगती होऊन देश पुढे जाईल. म्हणजे आपले जागतिक महत्व वाढेल.                                  

                 -----xxx-----

६ - राज्यस्तरीय पाणी नियोजन

पाण्याचे जीवनातील व्यावहारिक दृष्टीने महत्व समजले की, त्याच्या नियोजनाचे महत्व अपोआप कळते. त्यामुळे प्रत्येक जलसाक्षर व्यक्ती अपोआपच यथाशक्ती पाण्याची काळजी घेईल. देशात आधीच शिक्षणाचे प्रमाण जेमतेम ५०-६० %, त्यातही फक्त अक्षर ओळखच असणारे किंवा सहीच येणारे किंवा काम चालाऊच लिहिता वाचता येणारे ज्यास्त आहेत. त्यामुळे जलनियोजनाचे गांभीर्य पाहिजे तसे येत नाही. तथाकथित सुशिक्षित सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी वाया घालवितात. ते जपायचे किंवा सांभाळायचे असते हे त्यांच्या लक्षातच येत नाही.
आपल्या कडील प्रत्येक राज्यात साधारणतः ५-६ मोठ्या नद्या असतात. व २०-२५ नद्या त्या मोठ्या नद्यांच्या उप नद्या असतात. इतक्याच नद्यांना १२ ही महिने पाणी असते. इतर नद्या, नाले, ओहाळ, डोह इ. ना ७-८ महिनेच वाहते पाणी असते. काही नाले तर ४-५ महिनेच वाहतात. ह्या बारमाही नद्यांच्या किनारी भागात बागायत शेती विकसित होते. त्याच भागात थोडे फार विहीर बागायत विकसित होते. ह्या मोठ्या नद्यांवर मोठी किंवा प्रमुख धरणे बांधल्यास त्यांच्या पाटाच्या अनुषंगाने शेतीचा हरित पट्टा तयार होतो. त्यालाच विकास म्हटले जात होते. परंतु हा ठराविक प्रकारचा व ठराविक ठीकानांचाच विकास ही संकल्पना आता मागे पडली. आता सर्वत्रच शेती विकास करण्याचे प्रयत्न सुरु झाले.
 आता ह्या प्रयत्नांमुळे मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्प आकारास येऊ लागले. त्यामुळे पूर्वीपेक्षा ज्यास्ती सिंचन क्षेत्र ठिकठिकाणी दिसू लागले. परिणामी राज्य सरकारांना पण आपल्या हक्काच्या पाण्याची जाणीव वाढत गेली व ते मिळविण्याचा प्राणपणाने प्रयत्न सुरु झाला. शेती समृद्ध म्हणजे राज्य समृद्ध. हा विचार बळावला. ह्याप्रमाणे प्रयत्नांनी व पैशांनी धरणे तर बांधता येतील. पण त्यात साठवण्याकरिता लागणाऱ्या पाण्याचे काय? ते कुठून आणायचे? ते तर मर्यादित व लहरी, अनिश्चित आहे. एखाद्या वर्षी सरासरी पेक्षा कमी. इतके की पिण्याच्या पाण्याचे पण दुर्भिक्ष. तर एखाद्या वर्षी ओला दुष्काळ, एव्हढेच  नव्हे तर महापुराचा धोका. त्याचेवर परिणामकारक उपाय म्हणजे समृद्ध जल शिवार योजना किंवा पाणी अडवा - पाणी जिरवा मोहीम. प्रत्येक क्षेत्रात पडलेला पावसाचा थेंब त्याच क्षेत्रात ज्यास्तीत ज्यास्त प्रमाणात जिरवा किंवा अडवा. त्याला खूप अंतरापर्यंत वाहून जाऊ द्यायचे नाही. त्यामुळे भूजल पातळी वाढते. भूजल साठाही वाढतो. ह्या भूजलाचा वापर उपलब्धतेनुसार पाहिजे तेंव्हा करता येऊ शकतो. पण त्याचा दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे भूपृष्ठावरील जल साठ्यापेक्षा भूजलाचे बाष्पीभवन कमी प्रमाणात होते व खोलवर पाण्याचे तर बाष्पीभवन होतच नाही. म्हणजे ते नुकसान वाचते. जमिनीतील ओलावा वाढल्याने हवेत गारवा येतो. वनीकरण किंवा वृक्षराजी वाढते. पर्यायाने पशु पक्षांचे संरक्षण होते. समृद्ध वनीकरणाने पर्जन्यमान वाढू शकते.
रहिवासी क्षेत्रात म्हणजे ग्रामीण किंवा शहरी वस्ती क्षेत्रात पडणारा पाऊस जमिनीवरून मोठ्या प्रमाणात वाहून जातो. त्याचा पुढे कुठेतरी उपयोग होतोच पण जेथून वाहून जातो तेथील जनता तर वंचितच राहते ना? म्हणून राज्ज्य सरकारांनी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. जसे— रेन वाटर हार्वेस्टिंग, पाझर तलाव, गाव तळे, शेत तळे, विहीर व तलाव पुनर्भरण, नाला बंडिंग, शेती सपाटी करण, समांतर चर (सी सी टी), वेग वेगळे प्रकारचे छोटे छोटे बंधारे, नाल्यांचे रुंदी व खोलीकरण, कोल्हापुरी बंधारे, भूमिगत बंधारे, चेक बंधारे, वनराई बंधारे, ग्राडोनीज बंधारे, ग्याबियन बंधारे इ.
त्या करिता राज्ज्य सरकारांनी भावी धोरणांची आखणी केली आहे. वेळोवेळी त्यात सुधारणा सुद्धा होत असतात. मोठ्या नद्यांवर मोठे, मध्यम, लघु प्रकल्प उभारणे. छोट्या नद्यांच्या जल शिवारात छोटे छोटे तलाव, नदी विकास, शिवार विकास, गाव तळे, शेत तळे इ. ना प्राधान्य देऊन अनुदान दिले जाते. त्याचा योग्य तो सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. मोठ्या जलाशयाचे पण काटेकोर नियोजन होऊ लागले. जेथे शक्क्य असेल तेथे जल विद्युत, जल वाहतूक, जल पर्यटन, नौका विहार, इ. सुरु होत आहे. तसेच ह्या पाण्याच्या साठ्याची विभागवार व उप-युक्तते नुसार आधीच आखणी होऊ लागली. उदा. पिण्याचे व वापरण्याचे पाणी, शेती करिता, औद्योगिकी करिता, मत्स्य उत्पादन, इ. अनेक प्रकारांसाठी पाण्याचे नियोजन केले जाते. ह्या करिता सरकारी यंत्रणा व नियोजन आवश्यक असते. आता प्रत्येक राज्ज्य सरकार त्यात लक्ष घालू लागले आहे. तरी अजून जन ज्यागृतीची गरज आहे.
आपण त्याकरिता ग्रामीण किंवा स्थानिक पातळी वरील जल नियोजन बघू.

                 ----- xxx -----

७-स्थानिक पातळी जल नियोजन –सरकारी

स्थानिक पातळी म्हणजे सलग्न ४-५ गावांमिळून एखादा गट तयार करणे व त्या एकून क्षेत्राचा जल नियोजनाचे दृष्टीने एकत्रित विचार करून त्याचा विकास करणे. त्यातील नाला रुंदीकरण व खोलीकरण, पाझर तलाव, गावतळे, रेन वाटर हार्वेस्टिंग, पाणी शुद्धीकरण, नळ योजना, सांड पाणी व्यवस्थापन व पुनर उपयोग, भूजल पातळी वाढविणे, सामाजिक वनीकरण, भूमिगत व भूपृष्टीय बंधारे, भूगर्भात अखंड अग्निज्यन्न्य खडक असल्यास त्याला भूगर्भातच सुरुंगाचे सहाय्याने तेथेच विदीर्ण करून निर्माण होणाऱ्या  भेगांमध्ये पाणी जिरविण्याचा प्रयत्न करणे. असे अनेक प्रकार आता उपलब्ध आहेत.
               डोंगर उतरणीवर एकमेकांना समांतर परंतु एकाखाली एक असे खोल चर खोदून त्यात पावसाचे पाणी अडवून ते जिरविण्याचा प्रयत्न करणे. भूपृष्ठाच्या मातीच्या थराची जाडी कमी आणि त्या खाली अखंड अग्निज्यन्य खडक असल्यास त्याच्या उतारावर भूमिगत बंधारे बांधून भूजल साठा वाढविला जातो किंवा त्या खडकाच्या थराला ठिकठिकाणी सुरंग लाऊन जमिनीतच त्याला विदीर्ण केले जाते त्यामुळे त्या थराची पाणी साठवण क्षमता वाढते. सामाजिक वनीकरण किंवा फळबागांना  प्रोत्साहन देऊन वातावरणातील  गारवा / आर्द्रता वाढवता येते. त्यामुळे पर्ज्यण्यमानही वाढू शकते. त्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होऊ शकते.
      अशा कामांकरिता सरकार प्रत्यक्षपणे शेतात काहीच काम करीत नाही. परंतु अंशतः किंवा पूर्णतः अनुदान देते. त्यातूनच विहिरी, नलिका विहिरी, विजेचे पंप, शेत तळे, गाव तळे, नाला बंडिंग, नाला ट्रेनिंग, तळ्यांचे पुनर्भरण, रेन वाटर हार्वेस्टिंग, जलसाठा नियोजन व संरक्षित वाटप, जलयुक्त शिवार, खोरे विकास, भूमिगत व भूपृष्ठीय बंधारे, ग्रामीण पाणी पुरवठा, सार्वजनिक कुरण विकास, अशा अनेक योजना राबविते. प्रयोगात्मक योजना उदा. कृत्रिम पाऊस पाडणे, तसेच पूर नियंत्रण, जमिनीची धूप थांबविणे, पर्ज्यन्य मापन योजना, शिवार फेरी, ग्राम सभा इ. योजना सुद्धा राबविते.
      राज्ज्य पातळी जल नियोजना व्यतिरिक्त जल नियोजन हे सरकारी स्थानिक जल नियोजन मानले जाते. त्यातच विभागीय, जिल्हा स्तरीय, तालुका स्तरीय, पंचायत-गट व ग्राम पातळी असे अनेक लहान मोठे प्रकार आहेत. अर्थात हे सर्व प्रयास जल नियोजन व सर्वत्र समृद्धी व्हावी या करिता आहेत.
      आता तर कमी पाण्यावर पिके येऊ शकतील अशी बियाणे संशोधनामुळे उपलब्ध होत आहेत. मानव स्नेही खते व रोग प्रतिकारक बियाणे मिळू लागली आहेत. जसे “ विजेची बचत म्हणजे विजेची निर्मिती ” असे म्हटले जाते. तसेच “ पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची ज्यादा उपलब्द्धी ”. असे म्हणता येईल. त्या प्रमाणेच आता पाणी फेर प्रक्रिया, पुनर भरण इ. कल्पनांचा उदय झाला. औद्योगिक वापरातून बाहेर पडलेले पाणी कमी प्रदूषित असल्यास जमिनीत सोडून लगतची भूजल पातळी वाढवली जाते किंवा फेर प्रक्रिया करून शेती उपयोगी बनविले जाते. सांड पाण्याचाही असा फेर उपयोग गाव पातळीवर होऊ शकतो. अशी कामे नियोजन व निधीकरिता सरकारी स्तरावर केली जातात. अशाप्रकारे प्रगती साधण्या करिता कल्पक व तीव्र तडफदार नेतृत्वाची गरज असते, हे नाकारता येत नाही. शुद्ध जल पुरवठा हे सुद्धा स्थानिक पातळीवरील सरकारी नियोजनच असते.
      पशु-पक्षांकारिता वनात, जंगलात पाणवठे तयार करणे, त्या पाण्याचे वेळोवेळी नमुने घेऊन शुद्धता तपासणे, पर्ज्यन्य नोंद ठेवणे, संबंधित हवामानाचा अंदाज घेऊन पिकापाण्यावरील त्याचा संभाव्य परिणाम जाहीर करणे अशी अनेक कामे सरकार करीत असते. जनतेनेही त्यात आपला उत्स्पृह सहभाग नोंदवायचा असतो. कारण सरकार म्हणजे तरी काय? आपणच निवडून दिलेल्या आपल्याच प्रतिनिधींचे एक सामुहिक-सार्वजनिक असे नेतृत्व असते.
      यशस्वी नियोजनाकरिता म्हणूनच यशस्वी व कुशल नेतृत्वाबरोबर उत्साही व सहकारी जनतेची साथ आवश्यक असते.

                                -----xxx-----  

८-स्थानिक पातळी जल नियोजन-व्यक्तिगत

समाज म्हणजे व्यक्तींचा समूह. व्यक्तीचा सर्वसाधारण स्वभाव म्हणजे त्या समाजाचा स्वभाव किंवा संस्कृती.  त्याच्या एखाद्या मोठ्या वस्तीला गाव म्हणतात. गाव म्हटले म्हणजे ही वस्ती व त्याचे चहु बाजूला असलेली शेती किंवा शिवार / क्षेत्र व त्या पातळीवरील जल नियोजन म्हणजे गावपातळी वरील जल नियोजन होय.
गावा जवळून वाहणारी एखादी नदी, पाट किंवा मानव निर्मित अगर नैसर्गिक जलाशय किंवा सार्वजनिक विहीर हे तेथील पेय जलाचे स्रोत होय. शेतीकरिता लागणारे पाणी म्हणजे लहान मोठ्या सिंचन चारी, विहिरी, नलिका कूप, तलाव, पाझर तलाव, सिंचन तलाव इ. हे मुक्ख्य स्रोत होय. शेतीला पूर्वी फड पद्धतीने पाणी दिले जात होते. म्हणजे शेतात वाफे बनवून त्यात पुरासारखे / मोकळे पाणी सोडून शेत भिजवत असत. त्यालाच flood/ फ्लड / फड पद्धत म्हणत असत. पण त्याला फार पाणी लागत असे म्हणून तो प्रकार बंद करून सारी / चारी पद्धत आली. आता तर ठिबक सिंचन, तुषार सिंचन इ. आले. नव्या प्रकारांमुळे उपलब्ध पाण्यात पूर्वी पेक्षा ज्यास्त शेती बागायत झाली. पोली हाउसने कीटक नाशकांचे नियोजन / काटकसर करता आली व पाण्याचे बाष्पीभवन सुद्धा कमी झाले. हे सर्व प्रकार म्हणजे व्यक्तिगत जल नियोजनच आहेत.
पाण्यातच खते व औषधे मिसळून सिंचन केल्यास त्याची मात्रा / प्रमाण कमी लागते व मनुष्य बळाचा  वापरही वाचतो. योग्य प्रमाण साधल्याने प्रदुषनही कमी होते. मानवाला निसर्गावर अवलंबून रहावेच लागते परंतु अश्या प्रयत्नांनी अवलंबित्व / पराधीनता / अगतिकता थोडिका होईना पण कमी होते. त्याचे दृश्य परिणामही दिसत आहेत. ह्या कामात शेती अधिकारी किंवा ग्राम सेवक यांची शेतकऱ्यांना मोठी मदत / मार्गदर्शन होते. हे सर्व शेती जलाबद्दल झाले. आता ग्रामीण भागातील पेय जल पाहू.
उघड्यावरच्या किंवा वहात्या पेय जलापासून बाटलीबंद पाण्या पर्यंतची प्रगती आपण पाहत आहोत. मोठे जल साठे निर्ज्न्तुकीकरण करून पाणी पिण्यायुक्त करणे. त्यात सांडपाणी न मिसळू देणे, जनावरानपासून सुरक्षित ठेवणे, जल वनस्पती –कचरा-शेवाळ यांपासून संरक्षण, यांत्रिक जलशुद्धीकरण योजना राबविणे, नळ-द्वारे सुरक्षित पाणी पुरवठा करणे, ही स्थानिक स्वराज्य संस्थेची कामे असली तरी ती व्यक्तींशी निगडीत आहेत म्हणून आपण ती पाहत आहोत. अशा प्रकारे पाणी घरात येऊन पोहचल्यावर पुढील काळजी व्यक्तीने करायची आहे. उदा. आलेले पाणी गाळून घेणे, स्वच्छ भांड्यात साठविने, पूर्वी मातीची फिल्टर्स असत आता विजेवर चालणारी फिल्टर्स आली. हे सर्व वैयक्तीक नियोजन झाले.
शेतात नलिका कूप, मोकळ्या विहिरी, शेत तळे, सायफन, चारी, उपसा सिंचन, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, इ. सुविधा बसविणे. हे व्यक्ती-गत नियोजन आहे. आधुनिक सूक्ष्म सिंचन प्रकारांनी ओलीत जमिनीचे क्षेत्र व पर्यायाने उत्पन्न वाढते.
गाव पातळीवर एखादा मोठा जलाशय असल्यास स्थानिकांना मत्स्योद्पादन, जल वाहतूक, इ.जोड धंदे मिळतात. मत्स्योद्पादानामुळे अन्नाची बचत होते. पुरेसे पाणी उपलब्ध असल्यास शेती मालावर प्रक्रिया उद्योग चालू करता येतो. पाण्यावर फेर प्रक्रिया करता येते. नाला क्षेत्रात डांगर वाडी, टर्बुजे, खरबुजे, काकडी, अशी तात्पुरती पिके घेता येतात. हे प्रकार अमलात आणणे मात्र व्यक्ती निरपेक्ष असते.
पाणी हे जीवन असल्यामुळेच आपले जीवनाचे अस्तित्व आहे व ते सुसह्य पण झाले आहे. असे हे पाणी मात्र आपण अत्यंत काटकसरीने वापरले पाहिजे. ही सर्वांचीच जबाबदारी आहे. बरेच लोक सकाळी दात घासतांना घासून होयीपर्यंत नळ चालूच ठेवतात, दाढी होईपर्यंत नळ चालूच असतो. याला जल साक्षरता म्हणता येणार नाही. आपण पैसा जेव्हडा काळजी पूर्वक खर्च करतो, तेव्हढीच काळजी पाणी वापरतांना घेतली पाहिजे.

                     -----xxx-----