प्रत्येक जीवाचा कल हा
संकटावर / अडचणीवर मात करून नवा पर्याय / मार्ग शोधण्याकडे असतो. त्यातूनच
उत्क्रांती साधत असते. त्याच प्रमाणे पाण्याच्या उपलब्ध प्रकारानुसार त्यातून
ज्यास्तीत जास्त चांगल्या प्रकारे पाणी कसे मिळविता येईल व हे चांगले / पेय जल कसे
सुरक्षितपणे साठविता येईल ? संरक्षितपणे व काटकसरीने कसे वापरता येईल ? असा विचार
अनादी काळापासून आपापल्या परीने प्राप्त परिस्थितीनुसार प्रत्येक जीव करीत आला.
पूर्वी पाणी अडविणे ही कल्पना अस्तित्वात
नव्हती. त्यामुळे जीवाने आपली वस्तीच पाण्याच्या स्त्रोतांजवळ केली. पाण्याच्या
जवळपास आश्रय घेतला. तूर्त आपण ह्या इतिहासात न डोकावता वर्तमानातीलच परिस्थितीचा
विचार करू व सर्व जीवांच्या प्रयत्ना ऐवजी फक्त मानवी प्रयत्नांचाच विचार करू.
सरोवरातील किंवा वहात्या
नदीतील पाण्याचा उपयोग मानव प्रथम पेय जल म्हणून करू लागला. पुढे जमिनीतून
येणाऱ्या झऱ्याचे पाणी स्वचछ पेय जल
म्हणून वापरू लागला. त्यातून विहिरीची कल्पना जन्माला आली. उन्हाळ्यात किंवा
दुष्काळात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असेल तेंव्हा मोठ्या जल स्त्रोतांच्या
आसऱ्याने तो राहू लागला. तो आपले पिण्याचे पाणी जनावरांकडून दुषित होऊ नये म्हणून
काळजी घेऊ लागला. पुढे पाणी गाळून वापरणे, उकळून घेणे, निर्जंतुक करणे, ऊर्ध्व पातन
करणे. अशा क्रिया तो शिकला. त्यातूनच पाण्याचे शुद्धीकरणाचे प्रकार निर्माण झाले.
आता पाण्याच्या स्वच्छतेनुसार
पाण्याचे प्रकार किंवा पाण्याच्या गरजेनुसार पाण्याची स्वच्छता पाहू.
१)मानवी वापराकरिता पेयजल
२) मानवी घरगुती वापराचे जल
३) पशून्करिता पेय जल ४) शेती करिता जल ५) औद्योगिक वापराकरिता जल ६) औषधी निर्मिती करिता जल ७)मत्स्योद्पादन,
जलविद्यूत, जलवाहतूक, पर्यटन, नौकाविहार इ. अशा अनेक कारणांनी मानवाला कमीजास्ती
शुद्धतेचे पाणी आवश्यक असते व तो गरजे नुसार आणि प्राप्त परिस्थितीनुसार ते
मिळविण्याचा प्रयत्न करतो.
१) मानवी पेय जल – १००%
शुद्ध असलेच पाहिजे असे नाही. त्यात काही प्रमाणात नैसर्गिकपणे परंतु मानविजीवनास
उपयुक्त असे क्षार विद्राव्य स्वरुपात असल्यास चालते.
२)मानवी घरगुती वापरासाठी –
अन्न शिजविणे, अनेक प्रकारच्या साफ सफाई, सांडपाणी व मल वित्सर्जन इ. कामांसाठी लागणारे
पाणी सर्वसाधारणपणे स्वच्छ असले तरी
चालते.
३) पशु करिता पेय जल –
सर्वसाधारणपणे स्वच्छ असावे.
४) शेती उपयोगी पाणी – वरील
१,२,३, प्रकार पेक्षा ज्यास्त अशुद्ध असले तरी चालू शकते. खत मिश्रीत, गाळ किंवा
शेतीपयोगी क्षार मिश्रित पाणी चालते.
५) औद्योगिक वापराकरिता
पाणी – गरजेनुसार स्वच्च असावे.
६) औषधी निर्मिती करिता –
अति शुद्धच असले पाहिजे.
७) मत्स्योत्पाद्नाकरिता
पाणी – पाण्याचे साधारणपणे दोन प्रकार समजले जातात. अ) खारे पाणी व ब) गोड पाणी.
मत्स्योत्पादना करिता दोन्ही प्रकारांचे पाणी चालते. परंतु समुद्री जलातील व
नद्यातील मत्स्योत्पादन हे नैसर्गिक मानले जाते. परंतु लहान मोठे मानव निर्मित तलाव
किंवा जलाशयातील मत्स्योत्पादन हे मानवी प्रयत्नात मोडते. त्या करिता साधारण
स्वच्छ पाणी चालते.
मत्स्योत्पादन, जल विद्युत, जल वाहतूक ( कालवे, मोठ्या नद्या, मोठी
धरणे-जलाशय ),
पर्यटन व नौका विहार इ.
करिता पाणी साधारण स्वच्छ चालते. अशुद्ध, अस्वच्छ, घान, प्रथम वापरा नंतरचे पाणी
हे प्रदूषित समजले जाते व त्यातील अशुद्धतेला कारणीभूत असलेले घटक काढून टाकून ते
परत वापरता येते. अशा प्रक्रियेला फेर प्रक्रिया म्हणतात. पाण्यावर फेरप्रक्रिया
करतांना ते प्रक्रिया करावयाचे पाणी किती दुशीत आहे? फेर प्रक्रीये नंतर ते
कशाकरिता वापरावयाचे आहे? यावर फेर प्रक्रिया कोणती व कशी करायला पाहिजे ते
अवलंबून असते.
फेर प्रक्रिया ही व्यवहारी, स्वस्त, टिकाऊ, कमीत कमी मानवी बळ खर्च
होणारी असावी.
पेय जल ज्यास्तीत ज्यास्त
शुद्ध असावे म्हणून अनेक प्रकारच्या प्रक्रिया करीत शुद्ध करतात.
उदाहरणार्थ वेगवेगळ्या
प्रकारच्या गाळण्या वापरून, तुरटी सारखे पदार्थ वापरून पाण्यातील तरंगणारे कण
तळाला बसवून, हवा व सूर्य प्रकाशात पाणी कारंज्या सारखे उडवून, औषधींनी निर्जंतुकीकरण
करून, साठा संरक्षित करून, सुरक्षित पाणी पुरवठ्याने किंवा बाटलीबंद पाणी पुरवठा
करणे.
जलाशयातील पाणी थेट इतर घरगुती उपयोगाकरिता, पशुन्करिता, सांडपाणी, शेती,
औद्योगिक कामासाठी इ.साठी वापरता येते. औद्योगिक वापरातील पाणी किंवा इतर वापरून
परत आलेले पाणी फेर प्रक्रियेने शेती उपयोगी बनवितात.
पाण्याचे किती प्रमाणात शुद्धीकरण करावे? कश्या प्रकारे करावे ?
जलाशयातील पाणी किती स्वच्छ असावे? त्याची शुद्धता कशी राखावी? हा विषय पूर्णपणे
वेगळा आहे. म्हणून तूर्त आपण येथेच थांबू. आपण येथे मानवी प्रयत्नांनी पाणी शुद्ध
होते व वापरले जाते. एव्हडेच पाहत आहोत. ------x------