शरीरात किती टक्क्ये पाणी
असते ? ७०% टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास नक्की किती ? हा आरोग्य व शरीर
शास्त्राचा विषय आहे. येथे आपण त्या शास्रातील “ पाणी हाच जीवान्मद्ध्ये प्रमुख
घटक असतो ” हा सर्व मान्य नियम गृहीत धरून पुढे जाऊ. अवकाशातील ग्रहांचा व
त्यावरील जीवांचा शोध मानव घेत आहे. त्यात प्रथम त्या ग्रहावर पाणी आहे का ?
असल्यास तेथे जीवाचे अस्तित्व कसे शक्य आहे, याचा शोध घेतला जातो. याचाच अर्थ असा
की, पाण्याशिवाय जीवाचे अस्तित्वच शक्य नाही. असे हे पाणी म्हणजेच जीवन. अति सूक्ष्म
जीवापासून ते हत्तीसारख्या महाकाय जीवापर्यंत सर्वांना पाण्याची मुलभूत गरज असते.
वनस्पती सुद्धा जिवंत असल्याने त्यांनाही पाण्याची गरज असतेच. याचा अर्थ समृध्द
जीवन, निरोगी शरीर यांचा सम्बंद्ध जीवन्दाई पाण्याशी असतो. हवा, पाणी, अन्न, वस्त्र,
निवारा ह्या मुलभूत गरजा आहेत. पैकी हवा निसर्गाने सर्वत्र उपलब्द्ध करून दिली
आहे. त्याकरिता जीवाला विशेष परिश्रम करावे लागत नाहीत. पाणी हे ठराविक
स्रोतांमधून मिळते. अन्न शोधून / कष्ट पूर्वक मिळवावे लागते. निवारा शोधावा किंवा
तयार करावा लागतो. वस्त्र हे शरीर संरक्षणाचा एक भाग आहे, त्यामुळे ते पण
प्रयत्नांनीच मिळते. अशा गरजान्मद्धे प्रमुख गरज पाण्याचीच असते व ते ज्यास्तित
ज्यास्त शुद्ध व स्वच्छ असावे लागते. त्या शिवाय आरोग्य सांभाळणे शक्य नाही.
पाण्याच्या अशुद्धपणा पासून पचनाचे विकार होतात. अपचनामुळे इतरही रोग होतात. रक्त
दोष सुद्धा निर्माण होतात, व त्यातूनही काही आजार निर्माण होतात.
पाणी उकळून गार करून
पिण्यापासून तर बाटलीबंद पाण्यापर्यंत माणसाने प्रगती केली. तरी वेगवेगळे आजार
नव्याने वेगवेगळ्या कारणांमुळे येत आहेत. काही जुनेच आजार नव्याने थोड्याफार फरकाने
येत आहेत. साधारणपणे खाणे, पिणे, राहणीमान, प्रदूषण, अन्न प्रकार, शेतीतील खाते,
इ. मुळे आजार वाढतात. आपण कितीही पौष्टिक, सकस, आहार घेतला तरी स्वच्छ पाण्याअभावी
पचन संस्थेचे विकार व त्यातून पुढे उत्सर्जन संस्थेचे विकार होतात. त्यामुळेच रक्त
दुषित होऊ शकते. शहरी भागात साधारणपणे स्वच्छ पाणी असते परंन्तु ग्रामीण भागात
स्वच्छ पाणीच काय पण अस्वच्छ पाणी सुद्धा उपलब्ध होत नाही. ३ ते ४ कि. मी. वरून
मिळेल तसे विहीर, झरा, इ. चे पाणी आणावे लागते. पशु पक्षी सुद्धा हेच पाणी वापरतात.
कायम दारिद्र्य, अज्ञान, कुपोषण, अंध श्रद्धा यांच्या आवरणात जखडून पडलेल्या
भारताच्या ग्रामीण परंतु बहुसंख्य जनतेचा आपण विचार करीत आहोत. मिळेल ते पाणी पिऊन
बालपणापासून म्हातारपनापर्यंत सर्वच नागरिक जीवन कंठीत आहेत. त्याकरिता सर्वत्र
उपलब्ध होऊ शकणारे स्वच्छ पाणी, वाटर फिल्टर सारखी परंतु स्वस्त उपकरणे सरकारने
सर्वत्र उपलब्ध करून दिली पाहिजेत. हे सरकार व आपल्या सारख्या सुशिक्षित आणि
सुरक्षित जीवन जगणाऱ्या नागरिकांचेही कर्तव्य आहे. सामाजिक बांधिलकीहि आहे. पाणी
शुद्ध करण्याच्या परिणामकारक व स्वस्त पद्धती शोधणे हे आपलेच काम आहे. शेतीकरिता
रासायनिक किंवा सदोष पाणी, तसेच रासायनिक खते या ऐवजी निर्दोष पाणी व सेंद्रिय खते
वापरली पाहिजे.“ स्वच्छ पाणी म्हणजेच निरोगी जीवन ”. निरोगी जनता म्हणजेच निरोगी व
सदृढ राष्ट्र. हे सूत्र जपून प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवला पाहिजे. हे प्रत्येक
देशवासीयाचे परम कर्तव्यच आहे. दुर्गम भागातील उपलब्ध पाण्याच्या सर्व प्रकारांचे
नमुने शास्त्रीय पद्धतीने गोळा करून त्या त्या जिल्ह्याच्या प्रयोग शाळेत त्याची
तपासनी करून त्या त्या भागात योग्य ती उपाय योजना केली पाहिजे. शिक्षणाचा प्रसार
केला पाहिजे. अति दुर्गम भागापासून तालुक्याच्या गावाला जोडणारे रस्ते तयार झाल्यास
त्या भागाला तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकेल. रस्त्यामुळे शिक्षणाचा प्रसार
व इतर सुविधा निर्माण होऊ शकतील. त्यामुळेच परिस्थितीत फरक पडू शकेल.
------xxx-----
No comments:
Post a Comment