समाज म्हणजे व्यक्तींचा
समूह. व्यक्तीचा सर्वसाधारण स्वभाव म्हणजे त्या समाजाचा स्वभाव किंवा संस्कृती. त्याच्या एखाद्या मोठ्या वस्तीला गाव म्हणतात.
गाव म्हटले म्हणजे ही वस्ती व त्याचे चहु बाजूला असलेली शेती किंवा शिवार / क्षेत्र
व त्या पातळीवरील जल नियोजन म्हणजे गावपातळी वरील जल नियोजन होय.
गावा जवळून वाहणारी एखादी
नदी, पाट किंवा मानव निर्मित अगर नैसर्गिक जलाशय किंवा सार्वजनिक विहीर हे तेथील
पेय जलाचे स्रोत होय. शेतीकरिता लागणारे पाणी म्हणजे लहान मोठ्या सिंचन चारी,
विहिरी, नलिका कूप, तलाव, पाझर तलाव, सिंचन तलाव इ. हे मुक्ख्य स्रोत होय. शेतीला
पूर्वी फड पद्धतीने पाणी दिले जात होते. म्हणजे शेतात वाफे बनवून त्यात पुरासारखे
/ मोकळे पाणी सोडून शेत भिजवत असत. त्यालाच flood/ फ्लड / फड पद्धत म्हणत
असत. पण त्याला फार पाणी लागत असे म्हणून तो प्रकार बंद करून सारी / चारी पद्धत
आली. आता तर ठिबक सिंचन, तुषार सिंचन इ. आले. नव्या प्रकारांमुळे उपलब्ध पाण्यात
पूर्वी पेक्षा ज्यास्त शेती बागायत झाली. पोली हाउसने कीटक नाशकांचे नियोजन / काटकसर
करता आली व पाण्याचे बाष्पीभवन सुद्धा कमी झाले. हे सर्व प्रकार म्हणजे व्यक्तिगत
जल नियोजनच आहेत.
पाण्यातच खते व औषधे मिसळून
सिंचन केल्यास त्याची मात्रा / प्रमाण कमी लागते व मनुष्य बळाचा वापरही वाचतो. योग्य प्रमाण साधल्याने
प्रदुषनही कमी होते. मानवाला निसर्गावर अवलंबून रहावेच लागते परंतु अश्या
प्रयत्नांनी अवलंबित्व / पराधीनता / अगतिकता थोडिका होईना पण कमी होते. त्याचे
दृश्य परिणामही दिसत आहेत. ह्या कामात शेती अधिकारी किंवा ग्राम सेवक यांची
शेतकऱ्यांना मोठी मदत / मार्गदर्शन होते. हे सर्व शेती जलाबद्दल झाले. आता ग्रामीण
भागातील पेय जल पाहू.
उघड्यावरच्या किंवा वहात्या
पेय जलापासून बाटलीबंद पाण्या पर्यंतची प्रगती आपण पाहत आहोत. मोठे जल साठे निर्ज्न्तुकीकरण
करून पाणी पिण्यायुक्त करणे. त्यात सांडपाणी न मिसळू देणे, जनावरानपासून सुरक्षित
ठेवणे, जल वनस्पती –कचरा-शेवाळ यांपासून संरक्षण, यांत्रिक जलशुद्धीकरण योजना
राबविणे, नळ-द्वारे सुरक्षित पाणी पुरवठा करणे, ही स्थानिक स्वराज्य संस्थेची कामे
असली तरी ती व्यक्तींशी निगडीत आहेत म्हणून आपण ती पाहत आहोत. अशा प्रकारे पाणी
घरात येऊन पोहचल्यावर पुढील काळजी व्यक्तीने करायची आहे. उदा. आलेले पाणी गाळून
घेणे, स्वच्छ भांड्यात साठविने, पूर्वी मातीची फिल्टर्स असत आता विजेवर चालणारी
फिल्टर्स आली. हे सर्व वैयक्तीक नियोजन झाले.
शेतात नलिका कूप, मोकळ्या
विहिरी, शेत तळे, सायफन, चारी, उपसा सिंचन, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, इ. सुविधा
बसविणे. हे व्यक्ती-गत नियोजन आहे. आधुनिक सूक्ष्म सिंचन प्रकारांनी ओलीत जमिनीचे
क्षेत्र व पर्यायाने उत्पन्न वाढते.
गाव पातळीवर एखादा मोठा
जलाशय असल्यास स्थानिकांना मत्स्योद्पादन, जल वाहतूक, इ.जोड धंदे मिळतात.
मत्स्योद्पादानामुळे अन्नाची बचत होते. पुरेसे पाणी उपलब्ध असल्यास शेती मालावर
प्रक्रिया उद्योग चालू करता येतो. पाण्यावर फेर प्रक्रिया करता येते. नाला
क्षेत्रात डांगर वाडी, टर्बुजे, खरबुजे, काकडी, अशी तात्पुरती पिके घेता येतात. हे
प्रकार अमलात आणणे मात्र व्यक्ती निरपेक्ष असते.
पाणी हे जीवन असल्यामुळेच
आपले जीवनाचे अस्तित्व आहे व ते सुसह्य पण झाले आहे. असे हे पाणी मात्र आपण अत्यंत
काटकसरीने वापरले पाहिजे. ही सर्वांचीच जबाबदारी आहे. बरेच लोक सकाळी दात घासतांना
घासून होयीपर्यंत नळ चालूच ठेवतात, दाढी होईपर्यंत नळ चालूच असतो. याला जल
साक्षरता म्हणता येणार नाही. आपण पैसा जेव्हडा काळजी पूर्वक खर्च करतो, तेव्हढीच
काळजी पाणी वापरतांना घेतली पाहिजे.
-----xxx-----
No comments:
Post a Comment