पृथ्वीवर साधारणपणे पाण्याची
उपलब्धता पाऊसामुळेच होते. पाऊसाचे पाणी उताराच्या दिशेने /नदीमधून जलाशयाकडे / समुद्राकडे
वाहत जाते. पाऊसाचेच व नद्यांचे पाणी जमिनीत सुद्धा मुरते. ह्या जमिनीत मुरलेल्या
पाण्यालाच भूजल / भूगर्भजल इ. म्हणतात. काही ठिकाणी भूपृष्ठाच्या विशिष्ठ रचनेमुळे
नैसर्गिक तलाव, सरोवरे, डोह इ. तयार होतात. ही सर्व जल उपलब्धतेची निसर्ग निर्मित
साधने आहेत. मानव निर्मित जल साठे म्हणजे मानवी प्रयत्नांनी पाणी अडविणे, भूगर्भातून
पाणी वर काढून वापरणे, कृत्रिम पाऊस पाडणे,आर्द्रतेचे घनिभवन करून पाणी मिळविणे,
अशुद्ध अथवा समुद्री जला पासून शुद्ध पाणी मिळविणे इ. अर्थात ह्या सर्वांमध्ये पाणी
हे निसर्ग निर्मितच असते. परंतु ते मानवी प्रयत्नांनी गरजेनुसार व सोयीनुसार
मिळविले जाते.
शुद्ध पाणी म्हणजे फक्त
हायड्रोजनचे दोन परमाणु व प्राण वायूचा एक असे संयुग होय. त्यात इतर क्षार किंवा
कोणतेही विद्राव्य अगर घन पदार्थ मिसळले जाने म्हणजे पाण्याची अशुद्धता. काही
अशुद्धतांमुळे रासायनिक प्रक्रिया सुद्धा घडून येते. काही अशुद्धता काही प्रमाणात
आरोग्याला सहाय्यक सुद्धा ठरतात. उदा. बाजारात उपलब्ध पाण्याच्या बाटलीतील पाणी/
मिनरल वाटर हे शास्त्रीय दृष्ट्या शुद्ध नसते परंतु आरोग्याला मात्र योग्य ठरते.
पाण्याचे नैसर्गिक रित्या सुद्धा शुद्धीकरण किंवा स्वच्छता होत असते. उदा.
समुद्राच्या अशुद्ध पाण्याचे सूर्याच्या उष्णतेने बाष्पीभवन होते. ते अत्यंत शुद्ध
असते. शुद्ध पाणी बाष्प रूपाने आकाशाकडे निघून जाते म्हणजेच समुद्र जळातील क्षार, अशुद्धता
समुद्रातच शिल्लक राहते. युगायुगाच्या ह्या प्रक्रियेमुळे समुद्रीजल खारट व अशुद्ध
झाले आहे. क्षार व अशुद्धतेचा लोंढा सतत समुद्रात येत असतो. त्यामुळेसुद्धा समुद्रीजल
आजच्या रुपात अस्तित्वात आहे.
बाष्पीभवन मानवनिर्मित
जलाशयातुनही होत असतेच पण समुद्रजलाच्या तुलनेत हे न गण्य असते. असो, असे हे बाष्प
अर्थात बाष्परुपातील शुद्ध जल भूपृष्ठाच्या किंवा जलपृष्ठाच्या लगतच्या हवेच्या
थरांच्या तुलनेत हलके असल्याने ते वर वर जाते. तेथील थंड वातावरणाने ते घनीभूत होत
जाते. म्हणजेच त्याचे ढगात रुपांतर होते. कधी कधी अति गारव्याने त्याचे बर्फात
(स्नो) रुपांतर होते. आता हे ढग/ बर्फ/ गारा रूपातील पाणी अति शुद्धच असते. कारण
हवा अति उंचावर विरळ व कमी प्रदूषित असते. नैसर्गिक प्रक्रियेने हे ढगांच्या रूपातील
पाणी पावसाच्या रूपाने भूपृष्ठावर येते. (पाऊस कशामुळे पडतो याचा विचार आपण येथे
करीत नाही.). हे पाणी भूपृष्टावर पडण्या आधी पर्यंत काही प्रमाणात धुलीकनांच्या
सम्पर्कात येऊनही जवळ जवळ शुद्धच असते. परंतु जमिनीवर पडल्यावर ते माती, धूळ, इतर
क्षार, पालापाचोळा, कचरा यांचे संपर्कात येते आणि मोठ्या प्रमाणात अशुद्ध बनते.
पावसाचे पाणी जमिनीवरून उताराच्या दिशेने वाहत जाते. त्यालाच पाण्याचा अपघाव
(रनओफ) असे म्हणतात. हे पर्ज्यन्य जल नाले, ओहोळ व पुढे नद्यांचे स्वरुपात वाहत
जाऊन जलाशयात रुपांतरीत होते किंवा समुद्राला जाऊन मिळते. जमिनीवरून पर्जन्य जल
वाहत असतानाच ते काही प्रमाणत जमिनीत मुरते. त्या मुरलेल्या जलालाच भूजल किंवा
भूगर्भ जल म्हणतात. हेच जल पुढे नदी, झरे, विहिरी इ. ठिकाणी प्रकट होते. आपला
मुद्दा पाण्याच्या शुद्धतेशी संबंधित आहे. पावसाचे पाणी जमिनीवर पडण्या पूर्वी
बहुंशी शुद्ध असते. हे नैसर्गिक शुद्धीकरणच असते. अजून नैसर्गिक जल शुद्धीकरणाचे
काही प्रकार पाहू.
पर्जन्यजल जमिनीवरून अनेक
प्रकारे नदीत पोहोचल्यावर ते नदी रूपाने वाहतांना माती, क्षार, मोठ्या प्रमाणावर गाळाच्या
रुपात नदी तळाला किंवा किनाऱ्याला अपोआप सुटतात/ साचतात व पाणी पुढे पुढे वाहत जाते. म्हणजे शुद्धतेचे
प्रमाण वाढते. तसेच पाणी भूगर्भातून वाहतांना सुद्धा भूगर्भ रचनेमुळे आतल्या आत
उतार शोधून वाहत राहते. त्यामुळेच विहिरींना पाणी येते. पाणी भूगर्भातून वाहतांना
म्हणजे मातीच्या वगवेगळ्या थरातून जातांना गाळले जाऊन अपोआप स्वचछ होते. तसेच
सूर्य प्रकाश पाण्यावर पडूनही व हवेतील प्राणवायू पाण्यात काही प्रमानात मिसळला
जातो, त्यामुळेहि पाण्याची शुद्धता वाढते. जलचरांकडूनहि पाण्यातील काही अशुद्ध कण
किंवा सूक्ष्म वनस्पती अन्न म्हणून वापरले जाते त्यामुळे सुद्धा पाणी शुद्ध होत
रहाते. हे सर्व जलशुद्धीकरनाचे नैसर्गिक प्रकार आहेत. आता आपण मानवी प्रयत्नांनी
जलशुद्धीकर्नाचे प्रकार पाहू.
--------------------------xxx---------------------------
No comments:
Post a Comment