सुमारे पंचवीस वर्षापुर्वी जलव्यवस्थापन / जलनियोजन / जलसाक्षरता हे शब्द सुद्धा
आपल्याकडे म्हणजे जनसामान्याकडे ,प्रचारात नव्हते . त्यावेळी ह्या शब्धांचा फारतर
शब्दशः अर्थाची आपण कल्पना करू शकलो असतो .परंतु २१ शतकाची सुरुवातच पाणी समस्येपासून
झाली आहे. पाण्यावरून जागतिक किंवा महायुद्धे होतील असे भाकीत अनेक पंडितांनी वर्तवली
आहेत .आता त्यातील सत्य, तथ्य, अगत्य कळू लागले आहे. वाढलेल्या लोकसंखेमुळे
अन्नाची मागणी, पेयजल, शेतीजल, औद्योगीक जल ह्या समस्या वाढल्या आहेत. आता तर मोठे जलाशय प्रकल्पांची
मागणी होत आहे. त्यातूनच मोठ्या कालव्यांतील भूपृष्ठीय जलवाहतूक, मत्स्योत्पादन ,जलविद्युत निर्मिती, नौका विहार, पर्यटन विकास, सामाजिक वनीकरण व वन्य
पशुसंवर्धन, आर्द्रता नियमन, जागतिक पर्यावरण इ. विषय हळू हळू पुढे येऊ लागले आहेत. अशा सर्व पार्श्वभूमीचा
विचार केल्यास ह्या सर्व समस्या किंवा मागण्या पाणी आधारितच आहेत .
अवकाशीय / खगोलशास्त्रीय
संशोधनात नेहमी ऐकायला मिळते की, अमुक एका ग्रहावर पाण्याचे अस्तित्व असल्याच्या
खुणा दिसून आल्या. त्यामुळे तेथे जीवाच्या अस्तित्वाची शक्यता असावी .....वगैरे.
याचा अर्थ पाणी हेच जीवन आहे. पाण्या वाचून जीवाचे अस्तित्वच संभवत नाही. अशा ह्या
पाण्याचे नियोजन करण्याची वेळ आली आहे.
काटकसरीने पाणी वापरसुद्धा
दोन प्रकारे होऊ शकतो. १) पाणी वाया न जाऊ देता प्रमाण बद्धतेने वापरणे. 2) कमी
पाण्याची पिके ,कमी पाण्याचे उद्योग धंदे इ. निवडणे. पिण्याच्या पाण्यातील सांड पाण्या पासून शेतीला पाणी पुरवठा
किंवा गटारीच्या पाण्याचा खत व पाणी म्हणून शेतीत उपयोग करणे. ही सुद्धा पाणी बचतच
आहे. औद्योगिक वापरातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचे पुनर प्रक्रियेने शेती योग्य पाणी
बनविणे. हे ही शक्य होणार आहे. त्या करिता जागतिक पातळीवर व प्रत्येक
नागरिकाने आप आपल्या पातळी वर हा प्रयत्न कर्तव्य म्हणून केला पाहिजे .मानवता
धर्माचा तो एक अत्यावशक भाग असल्याचे जनप्रबोधन झाले पाहिजे.
अश्या ह्या जल नियोजनाचा हा
अभ्यास क्रम आता आपण क्रमा क्रमाने पाहू.
... x ...
XX
ReplyDelete👍
ReplyDelete👍
ReplyDelete